विवेकानंद विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन :

शालेय जीवनातच आपले आयुष्य खऱ्या अर्थाने घडते. ती प्रक्रिया विद्यार्थ्यांना कळत नसली तरी शिक्षक मुलांकडून मेहनत करून घेत असतात. आज विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीत सादर केलेले गणिताचे विविध प्रयोग, चित्रकला, रांगोळी इ. कलाप्रकार पाहून मलाच शालेय वातावरणात आल्याचा अनुभव आला. शालेय जीवन खूप छान असते, त्याचा आनंद घ्या, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी येथे केले.

       विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर संस्थेचे अध्यक्ष विनायक दादा दाते, संचालक सौ. सुषमा दाते, समन्वयक विजय कासलीकर, पालक शिक्षक संघाचे सहसचिव प्रकाश साबळे, शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे, पर्यवेक्षक मारोती जाधव, स्नेहसंमेलन प्रमुख दिनेश गहरवार व जया बेहरे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी पृथ्वी तुरकर, परिणीता फुलझेले, केवल गवई उपस्थित होते.
मुलांनो भरपूर मेहनत करा शिक्षकांना अधिकाधिक प्रश्न विचारा मोबाईल मध्ये गेम खेळण्यापेक्षा मैदानावर खेळ विविध कलाप्रकारात स्वतःला गुंतवून घ्या कारण भारत महासत्ता व्हायचा असेल तर तो मोबाईल खेळण्यातून नव्हे तर सुदृढ तरुण घडण यातून होणार आहे असेही माधुरी बाविस्कर याप्रसंगी म्हणाल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाध्यक्ष विनायक दादा दाते म्हणाले, शालेय स्नेहसंमेलन हा खूप आनंददायी अनुभव असतो. तो पुन्हा मिळत नाही. त्यामुळे स्नेहसंमेलनाचा आनंद घ्या. प्रदर्शनातील सादरीकरणाबद्दल त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.